Friday, 16 September 2022

मनन

जेव्हा जग बंद होतं

तेव्हा उघडते वही

तिच्यावर कोरावयाची चार अक्षरे

आणि वाटलेलं काही


वाटतंय तर खूप काही

पण त्यातलं किती उरणार 

आणि किती उतरणार

याला मात्र नेम नाही


शून्यातल्या शून्यकडचा प्रवास

माझा माझ्यातला

चालू राहिल संपेल

याला काही उत्तर नाही


तरीही पुढे जातोय असं वाटून

आहे तेच करत राहणं

सुरु राहिल

त्याच्यामध्ये खंड नाही


बंड नको म्हणतात विचार सुद्धा आता

शांतता हवी जीवाला

मौनाची लेखणी शोधताना 

सापडेल का काही

No comments:

Post a Comment