जेव्हा जग बंद होतं
तेव्हा उघडते वही
तिच्यावर कोरावयाची चार अक्षरे
आणि वाटलेलं काही
वाटतंय तर खूप काही
पण त्यातलं किती उरणार
आणि किती उतरणार
याला मात्र नेम नाही
शून्यातल्या शून्यकडचा प्रवास
माझा माझ्यातला
चालू राहिल संपेल
याला काही उत्तर नाही
तरीही पुढे जातोय असं वाटून
आहे तेच करत राहणं
सुरु राहिल
त्याच्यामध्ये खंड नाही
बंड नको म्हणतात विचार सुद्धा आता
शांतता हवी जीवाला
मौनाची लेखणी शोधताना
सापडेल का काही
No comments:
Post a Comment