शहारून येते मन
होतात स्वप्नाभास
सत्य जाणवता मी
सावरते स्वतःस
हरवत जाते वाट
जेव्हा मनी विचारांत
वळणाशी मी थांबते
काहीशी उरते एकांतात
हे असे मी किती जपावे
मलाही वाटते काही असावे
स्वछंद होऊनी त्याकरिता
मी स्वतःला लुटत जावे
शब्दाला न मिळावा शब्द
मग कागद ही होतो जीर्ण
का सतत मला माझी
कविता भासते अपूर्ण
-इतिश्रुति