Tuesday, 24 November 2015

"नवलाई "

                             कधीकधी असं वाटतं सगळं सोडून द्यावं !तुम्हाला कधी असं वाटलंय?सगळं! जे काही आता आहे, ते सोडून दूर कुठेतरी ( for example हिमालयात  :P ) जावं.. शांत डोळे मिटून राहावं !कोणताच ताण नको का कसली काळजी नको !नसते विचार तर नकोच नको !मैं और बस मेरी तनहाई !wow !what a feeling !रटाळ चाललेल्या आयुष्याला जराशी गती द्यावी ,नवीन असं काही करावं जे या आधी कधी केलंच नव्हतं !नव्या आनंदात ,नव्या जगात हरवून जावं आणि या जगाचा विसर पडावा !हे जग आणि ते जग वेगळं आहे म्हणजे तरी काय नेमकं !सगळीकडे problems तेच असतात,माणसं तीच असतात. पण change of place तुम्हाला वेगळ्या विचारांच्या लाटेवर तरंगायला मदत करतं . एकाच गोष्टीचे वेगवेगळे पैलू बघायला शिकवतं !आणि त्यातून मिळणाऱ्या संवेदनांवर आयुष्य बहरतं !अशाच रोजच्या तोचतोचपणाला कंटाळलेल्यांसाठी  आज माझी अतिशय बालिश कविता !Actually आहे ते सगळं सोडून देऊ हा विचारच मुळात इतका बालिश आहे; मग शब्दांनी त्याच्याशी बालिशपणेच मैत्री करायला हवी नाही का ? :)

असे वाटते मला कधी
वारा सोसाट्याचा यावा
फेकुनी मजला दूरवर
मगच त्याने विसावा घ्यावा

ताऱ्यांनी त्या माथ्याभोवती
गरगरत मला जागे करावे
नव्या जगाचे नवे दरवाजे
दाखवत नभी पसार व्हावे

दारामागाचे गजबच नजारे
नेहमीचे त्यात 'ने' ही नसावे
नवीन वारे नवीन सारे
नव्या मलाही नवे पंख फुटावेत

उडत नव्या पंखांसमावेत
वाऱ्याशी मग पैज लढावी
दटावण्यास येता कोणी
बत्तीशी वेडावत दाखवावी

फांदीवरल्या पक्षासंगे
माझी अगदी गट्टी जमावी
हिंडत रस्ता भर रानामध्ये
आकाशातून  कशी सर पडावी

चिंब होऊन सड्यामध्ये
सारे कसे गंधून जावे
नव्या रसिक श्वासांनी मग
मन माझे तरळून जावे

मनातल्या भावनांचा एकेक
शब्द्पुष्प रचला जावा
गुंफत त्यास दोरीत सुराच्या
पक्ष्याने वाजवावा पावा

अशा गाण्याच्या तालावर वेड्या
मी बेभान नाचत रहावे
बागडून मनसोक्त थकून
मग डोळे मिटून निजून जावे !!

4 comments: